- अन्य
- 'शहर बदलू शकतं; पण सुरुवात आपल्यालाच करावी लागेल!'
'शहर बदलू शकतं; पण सुरुवात आपल्यालाच करावी लागेल!'
आधार सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बागुल यांचे आवाहन
सकाळ असो वा संध्याकाळ, ट्राफिक जाम, हॉर्नचा गोंगाट आणि पदपथावरील अतिक्रमण. आपल्याला याची सवय झालीय… पण प्रश्न असा आहे, यामध्ये आपला सहभाग किती ?
एक ज्वलंत उदाहरण... भाजी कुठून घेतो आपण? पदपथ अडवणाऱ्या अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांकडूनच ना? मग विचार करा,आपण तिथून खरेदी करतो.विक्रेते तिथे बसतात. पदपथ बंद होतो.पादचाऱ्यांना त्रास होतो.वाहतुकीला अडथळा होतो आणि मग आपण शिव्या देतो,प्रशासनाला - राजकारण्यांना… पण विचार करा यात नक्की दोषी कोण ? …तर आपणच.
मग काय करायला हवे ?
आजपासून एक ठाम संकल्प केला पाहिजे. तो म्हणजे 'अतिक्रमण करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याकडून खरेदी करणार नाही' मग पहा... स्वच्छ रस्ते,मोकळे पदपथ, सुरळीत वाहतूक, सुसंस्कृत शहर. होय,हे शक्य आहे… पण सुरुवात आपल्यालाच करावी लागेल.
लक्षात ठेवा, तुमचं खरेदीचं ठिकाण हेच शहराचं भवितव्य ठरवतं!
आपला,
हेमंत बागुल
आर्किटेक्ट
संस्थापक अध्यक्ष:आधार सेवा फाउंडेशन