शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरले चक्क पाच टँकर पाणी

मोटर आणि वीज वहन यंत्रणेची मोडतोड

शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरले चक्क पाच टँकर पाणी

बीड: प्रतिनिधी 

चार दिवस परगावी गेलेल्या शेतकरी कुटुंबाने परतल्यावर पाहिले तर त्यांच्या विहिरीतून चार- पाच टँकर पाणी गायब झालेले दिसले. चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता विहिरीवरील मोटर आणि वीज पुरवठा करणाऱ्या डीपीची मोडतोड केल्याचेही आढळून आले. 

साक्षाळ पिंपरी गावातील रंभा आणि त्र्यंबक काशीद हे शेतकरी पती पत्नी चार दिवसांसाठी नातेवाईकांच्या गावी गेले होते. परत आल्यावर पाहिले तर विहिरीतील पाणी तळाला गेलेले! तळाशी गाळयुक्त गढूळ पाणी तेवढे शिल्लक होते. 

काशीद यांची केवळ तीन एकर शेतजमीन आहे. या जागेत त्यांनी फळबाग लावली आहे. मागच्या वर्षी पाणी न मिळाल्यामुळे झाडे सुकून गेली. त्यामुळे काशीद यांनी शेतात विहीर घेतली. यावर्षी उन्हाळ्यातही विहिरीत थोडाफार पाणीसाठा शिल्लक होता. 

हे पण वाचा  ४५ प्रवासी तासगावला सुखरूप परतले!

मात्र, गावावरून आल्यावर विहिरीने तळ गाठल्याचे पाहून काशीद यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता या प्रकारात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने पुढाकार घेतला आहे. बीड पोलिसांनी पाणीचोरांना लवकरात लवकर गजाआड करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार दोषसिद्धीत पाचगणी पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
मेढा : पाचगणी पोलिस स्टेशनचे कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाचगणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यांमधील...
उपमुख्यमंत्र्याच्या गावकडे जाणारा तापोळा रस्ता गेला वाहून
६५ वर्षांच्या आजींचा रिक्षावर आत्मनिर्भरतेचा प्रवास!
अर्जुन कोळी यांची मिपा औरंगाबादच्या कोअर कमेटी सदस्यपदी निवड
‘टिळक’मध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण
खाजगी शाळेत प्रवेश घेऊन घरपट्टी, पाणी पट्टीची रक्कम मिळवा
डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advt