'गिरीश महाजन हे पक्ष फोडणारे दलाल'

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप

'गिरीश महाजन हे पक्ष फोडणारे दलाल'

मुंबई: प्रतिनिधी

टेंडरबाजी आणि खंडणीखोरी यातून माया जमवून पक्ष फोडणे हे भारतीय जनता पक्षाचे काम असून या कामासाठी नेमलेल्या दलालांपैकी गिरीश महाजन हे एक दलाल आहेत. राज्यातील सत्तेत बदल होईल, त्यावेळी पक्ष बदलणारे सर्वात पहिले गिरीश महाजन हे असतील, असा आरोप प शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

भाजप हा एकेकाळी पवित्र लोकांचा पक्ष होता. सध्या त्याची सूत्र भ्रष्ट, देशद्रोही लोक आणि ठेकेदार यांच्या हातात आहेत. भ्रष्टाचारी, देशद्रोही लोकांना एकत्र करून सध्याचा भाजप बनला आहे. या लोकांना बाजूला काढले तर तुमचा पक्ष आहे कुठे, असा सवाल राऊत यांनी भाजपला केला आहे. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन यांच्या संपत्तीची चौकशी सुरू झाली होती. त्यावेळी महाजन पक्ष बदलण्यास तयार होते. मी राजकारण सोडतो. शांतपणे घरात बसतो, असे निरोप त्यांच्याकडून येत होते. महाजन हे अत्यंत डरपोक नेते आहेत, असा दावा राऊत यांनी केला. 

हे पण वाचा  '... तर वाचला असता वैष्णवी हगवणेचा जीव'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्या भाजपला लाज वाटली पाहिजे. राजकारणात तुम्ही कोण होतात? बाळासाहेबांच्या शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवले. त्यात शिवसेनेला बुडविण्याची भाषा तुम्ही करता? ही भाषा तुम्हाला घेऊन बुडणार आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला. 

आजपर्यंत अनेक जण शिवसेनेत आले. अनेक जण बाहेर पडले. त्यांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली. मात्र, शिवसेना संपली नाही. संपणारही नाही. गिरीश महाजन यांच्या दहा पिढ्या आल्या तरी देखील शिवसेना संपणार नाही, असेही राऊत म्हणाले. 

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याबद्दल योग्य वेळ आल्यावर आपण सांगू, असेही राऊत म्हणाले. दोन्ही पक्ष एकत्र येण्याविषयी पडद्यामागे काही चर्चा, घडामोडी सुरू असतील तरी देखील त्याबद्दलची माहिती उघड कशी करता येईल, असा सवालही राऊत यांनी केला. 

 

About The Author

Advertisement

Latest News

बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी बिलावल यांचे शिष्टमंडळ अमेरिकेसह युनोमध्ये तोंडघशी
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर भारताप्रमाणेच पाकिस्तानने देखील आपली भूमिका मांडण्यासाठी माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली...
'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ'
'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 

Advt