आम्हा दिव्यांग व्यक्तींची तरी फसवणूक सरकारने थांबवावी

आझाद मैदानात दिव्यांग लाभधारकांचे धरणे आंदोलन 

आम्हा दिव्यांग व्यक्तींची तरी फसवणूक सरकारने थांबवावी

मुंबई / रमेश औताडे 

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या व्यवसायिक वाहन कंत्राटदाराचा मनमानी कारभार व व्यवसाय करण्यासाठी या वाहनांना शहरी भागाची बंदी या सरकारच्या जाचक अटीमुळे आम्ही व्यवसाय कुठे करायचा ? असा सवाल आझाद मैदानात दिव्यांग व्यावसायिक वाहन लाभधारकांनी आंदोलनादरम्यान केला आहे. सरकारने धडधाकट नागरिकांची फसवणूक करणे सुरू ठेवले आहेच. मात्र आम्हा दिव्यांग व्यक्तींची तरी फसवणूक करणे थांबवावी अशी विनंती दिव्यांग बांधवांनी केली आहे.

दिव्यांग व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा रहावा म्हणून सरकारनेच योजना आणली. मोफत वाहन दिले. मात्र व्यवसाय मात्र शहरी भागात करायचा नाही. ग्रामीण भागात जावा व व्यवसाय करा. अशी अट घातली आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगाला पण वाहन दिले आहे. त्याचे ठीक आहे ती स्थानिक असल्याने गावी व्यवसाय करू शकतो. मात्र आम्ही शहरी भागात राहतो. आम्हाला वाहन दिले आहे. आम्ही शहरातील घरदार, मुलांच्या शाळा सोडून गावी व्यवसाय कसा करणार ? गावातील दिव्यांग आम्हाला तिथे व्यवसाय कसा करू देईल ? असे प्रश्न करत आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले.

वाहन कंत्राटदार आहे हरियाणाचा. त्याने खेळण्यातील वाहन बनवले आहे. ते दुरुस्त करायला हरियाणाला आम्ही दिव्यांग जाणार कसे ? जेवढ्या किमतीत हे वाहन सरकारने घेतले आहे तेवढ्या किमतीचे हे वाहन नाही. १२ डिसेंबर २९२३ नंतर सुरू करण्याचे आदेश स्वयंप्रेरणेने मानवी हक्क आयोगाने दिले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून बेरोजगार दिव्यांगांना पर्यावरण स्नेही  वाहने प्रदान करण्यात आली. ही वाहने  हरयाणा चे कंत्राट मेसर्स मॅक ऑटो इंडिया मायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. त्यासाठी २४ कोटी ८७ लाख रूपयांची निविदा देण्यात आली होती. कोट्यवधी रूपये खर्च नेमके कुणाचे खिसे भरले गेले ? असा सवाल दिव्यांग करत आहेत.

हे पण वाचा  राज्यातील गोरगरीब आंदोलनकर्त्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणपोई : थंडगार पाण्याचा दिलासा !

दिव्यांगांनी कुठे व्यवसाय करावा, कसा करावा याबाबत कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्वे अर्जात उल्लेख केला नव्हता तसेच आरटीओ ने तसे म्हटले नव्हते. मात्र आता१०० रुपयाच्या मुद्रांकावर नोटरी पद्धतीने एमएमआरडीए परिक्षेत्रात व्यवसाय न करण्याबाबत सहमती पत्र लिहून घेतले जात आहे. हा अन्याय आमच्यावर का ? असा सवाल ठाणे महानगरपालिका दिव्यांग समन्वय समिती चे सदस्य मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूक खान यांनी आझाद मैदानात आंदोलन दरम्यान केला.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

गणितात पास करण्यासाठी उकळले लाखो रुपये गणितात पास करण्यासाठी उकळले लाखो रुपये
पुणे: प्रतिनिधी  विद्येच्या माहेरघरात गणिताच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेऊन त्यासाठी लाखो रुपये उकळण्याचा प्रकार पुणे...
'दहशतवादाला पोसणे पाकिस्तानला थांबवावेच लागेल'
वीज बंद, मीटर ठप्प – महसूल बुडतोय सरकारचा!
राज्यात अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र आयोगाची होणार स्थापना
Karad News | ‘कृष्णा विद्यापीठ’ गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख - राज्यपाल राधाकृष्णन
भारत रशिया मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ
'पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका'

Advt