साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा सातारकरांचा वज्र निर्धार
नियोजनाच्या पहिल्याच बैठकीत एक लाख पंधरा हजार रुपये निधी जाहीर
सातारा : साताऱ्यात पुढील सहा महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बुधवारी येथील पाठक हॉलमध्ये झालेल्या साहित्यप्रेमी सातारकर साहित्य संस्था सामाजिक संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकजुटीने आणि देखण्या नियोजनाच्या माध्यमातून यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. नियोजनाच्या पहिल्याच बैठकीमध्ये एक लाख पंधरा हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. साताऱ्याला ३२ वर्षानंतर साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. सर्व सातारकरांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मसाप शाहूपुरी शाखा व मावळा फाऊंडेशनचे ॲड. चंद्रकांत बेबेले, किशोर बेडकिहाळ, सचिन सावंत, वजीर नदाफ, अजित साळुंखे, आर. डी. पाटील, अनिल जठार, सतीश घोरपडे, आदी उपस्थित होते.
0000000000000