आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा

आरपारच्या लढाईची मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा

परभणी: प्रतिनिधी

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावे आणि सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाचा मोर्चा 29 ऑगस्टला मंत्रालयावर धडकणार आहे. दोन दिवसांसाठी मुंबईत या आणि तिसऱ्या दिवशी विजयाचा गुलाल अंगावर घ्या, अशी ग्वाही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला दिली आहे. 

गंगाखेड तालुक्यातील धारसुर येथे चावडी सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी मोर्चाची घोषणा केली. या मोर्चामध्ये तब्बल तीन ते चार कोटी मराठा बांधव सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा मोर्चा 27 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून सुरू होऊन पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, आळेफाटा, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर मार्गे 29 ऑगस्टला मंत्रालयाकडे जाईल. 

मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी मनोज जरांगे पाटील मराठवाड्यात ठिकठिकाणी चावडी सभा घेत आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरतील आणि मुंबईला तीन ते चार कोटी समाज बांधव मंत्रालयावर धडक देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

हे पण वाचा  मुस्लिम अत्याचाराच्या प्रश्नावर सर्व आमदार एकाच मंचावर

About The Author

Advertisement

Latest News

'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज' 'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज'
पुणे: प्रतिनिधी: पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने, शिवसेनेच्या नेत्या सोनाली मारणे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री  योगेश...
करवाढीच्या निषेधार्थ हॉटेल, रेस्टॉरंटचा १४ जुलै रोजी बंद
'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?'
ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते
आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा
'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू'
सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित केल्याबद्दल जल्लोष

Advt