सामान्य नागरिकांना घर देण्यासाठी सरकारचा पुढाकार

सत्तरहजार कोटी खर्च करून पाच वर्षात ३५ लाख घरांची उभारणी

सामान्य नागरिकांना घर देण्यासाठी सरकारचा पुढाकार

मुंबई: प्रतिनिधी 

सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत 'माझं घर, माझा अधिकार' योजनेनुसार राज्य सरकार पुढील पाच वर्ष ७० हजार कोटी रुपये खर्च करून तब्बल ३५ लाख घरांची उभारणी करणार आहे. 

राज्य शासनाच्या या धोरणानुसार सन २०३५ पर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही घरकुल उपलब्ध करून दिले जाणार आहे. या धोरणानुसार नवीन इमारतींच्या बांधणीसह झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

या योजनेसाठी गुंतवणूक केल्या जाणाऱ्या ७० हजार कोटी सह 'महा आवास निधी' वीस हजार कोटी रुपयांवर नेण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. याशिवाय आर्थिक दृष्ट्या मागास, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट अशा विविध आर्थिक गटातील नागरिकांना राज्य शासनाकडून घरकुल उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

हे पण वाचा  रत्नागिरी जिल्ह्याला माई रमाई च्या नावाची मागणी

About The Author

Advertisement

Latest News

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली! दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली!
नारायणगाव   नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू...
पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मातंग समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पैशाच्या लोभासाठी क्रौर्याची परिसिमा!
सन्मानजनक मानधनासाठी ज्युनिअर आर्टिस्ट आक्रमक
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने लावला चाप
दुष्काळग्रस्त गरजू विद्यार्थ्यांची यादी सरकारने मागवली

Advt