'... म्हणून आखले जात आहे नाथाभाऊंच्या बदनामीचे षडयंत्र'

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा आरोप

'... म्हणून आखले जात आहे नाथाभाऊंच्या बदनामीचे षडयंत्र'

जळगाव: प्रतिनिधी

मंत्रिमंडळातील मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांना जाळ्यात अडकविणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून नाथाभाऊंच्या बदनामीचे षडयंत्र आखले जात असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार खडसे यांनी केला. 

आपण आपल्या राजकीय कारकीर्दीत विषारी सापांची पिल्ले असलेल्या लोकांना मोठे केले, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. खडसे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. 

मंत्री गिरीश महाजन यांच्या दुष्कृत्यांच्या अनेक सीडीज प्रकाश लोढाकडे असतील. जोडे मारायचे असतील तर मला कशाला मारता? गिरीश महाजनला मारा. प्रकाश लोढाला मारा. आपण ज्यांना दूध पाजून मोठे केले, ती सापाची पिल्ले निघाली. आता तेच आपल्या विरोधात आंदोलन करत आहेत, असे खडसे म्हणाले. 

हे पण वाचा  'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले'

आपण आपला जावई प्रांजल खेवलकर याचे कधीही समर्थन केलेले नाही. मात्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर कोणत्याही महिलेची तक्रार नसताना नेमक्या कशाच्या आधारावर त्यांच्यावर आरोप करत आहेत, असा आपला सवाल असल्याचेही खडसे यांनी नमूद केले. 

About The Author

Advertisement

Latest News

राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अमराठी लोकांबद्दल द्वेष निर्माण करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व मनसेवर...
'सलीम जावेद च्या कहाण्या आता बंद करा'
'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'
'भारत काँग्रेस मुक्त करतानाच भाजप झाला काँग्रेस युक्त'
'कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर'
महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार
‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

Advt