'सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग?'

इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याच्या दुर्घटनेवर राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया

'सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग?'

मुंबई: प्रतिनिधी 

सत्ताधाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीतील विविध विभागांना कामाला लावून दुर्घटना घडण्यापूर्वी नियोजन करून उपाययोजना करता येत नाहीत का? क्या करता येत नसतील तर सत्तेत बसलेल्यांच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग, असे संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहेत. 

कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर 52 जण जखमी आहेत. या दुर्घटनेबद्दल राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

हा पूल धोकादायक होता तर त्यावरील वाहतुकीला बंद का घालण्यात आली नाही? पावसाळ्यापूर्वी पाहणी करून मुलांची का करण्यात आली नाही? निकामी पूल पाडून नव्या फुलांची उभारणी का झाली नाही, असे सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केले आहे. 

हे पण वाचा  वारकऱ्यांसाठी खुशखबर!, आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यांना हिरवा कंदिल

मॉन्सूनच्या पावसाला आता कुठे सुरुवात झाली आहे. एवढ्यात शहरात पाणी साठणे, रस्त्यांची चाळण होणे, फुल पडणे अशा घटना घडत आहेत. यापुढ काळात तरी सरकारने सतर्क राहून जनतेला दिलासा द्यावा, आशिष सूचना ठाकरे यांनी केली आहे. सरकार निष्काळजी राहणार असेल तर लोकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे, असेही ठाकरे म्हणाले. 

वर्षा पर्यटनाच्या नावाखाली करणाऱ्या नागरिकांना देखील ठाकरे यांनी खड बोल सुनावले आहेत. धोकादायक ठिकाणी जाताना विशेषतः कुटुंबासह जाता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला देखील ठाकरे यांनी दिला आहे. 

कुंडमळा दुर्घटनेतील मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

 

About The Author

Advertisement

Latest News

आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..! आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..!
सोलापूर - फुग्यांनी सजविलेल्या स्वागत कमानी…! बाळाचे पाय कलर मध्ये बुडवून पायाचे ठसे घेणेत दंग असलेल्या शिक्षिका…! शाळेत पहिले पाऊल...
गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत
नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे केसनंद मध्ये घराघरात पाणी घुसले....
डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडतर्फे श्रुती अगरवाल यांची पूर्णवेळ संचालकपदावर पदोन्नती
डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात
जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती 
शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण

Advt