बहिणी केवळ लाडक्याच नाही तर प्रामाणिकही

तब्बल चार हजार महिलांनी घेतली योजनेतून माघार

बहिणी केवळ लाडक्याच नाही तर प्रामाणिकही

मुंबई: प्रतिनिधी 

लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्रतेच्या निकषात नसणाऱ्या तब्बल चार हजार महिलांनी या योजनेतून वगळण्याची विनंती करणारे अर्ज केले आहेत. अशाप्रकारे बहिणी केवळ लाडक्याच नाहीत तर प्रामाणिक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या उत्पन्नाची व अन्य पात्रतेची पुन्हा पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे, ज्या महिलांकडे केवळ दुचाकीच नाही तर चार चाकी गाड्या आहेत आणि ज्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांबाबत तक्रारी आल्यावर पाच मुद्द्यांच्या आधारे महिलांच्या पात्रतेची पुन्हा पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

मात्र, आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही, असे लक्षात आल्यावर चार ते साडेचार हजार महिलांनी या योजनेचे लाभ परत केले आहेत. अशा महिलांकडून डिसेंबर महिन्यात काही रक्कम सरकारी तिजोरीत जमा झाली असून जानेवारी महिन्यातही महिला या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधी परत करीत आहेत. तसेच अनेक महिला योजना सुरू झाल्यानंतर विवाह करून परराज्यात गेल्या आहेत. अशा महिलांनी देखील आपण या योजनेसाठी पात्र नाही, हे स्वतःहून पुढे येऊन सांगितले आहे, अशी माहिती देतानाच तटकरे यांनी या प्रामाणिक महिलांचे आभार मानले आहेत. 

हे पण वाचा  विद्यार्थी आक्रमक: अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आरोप

सध्या अडीच कोटी महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यापैकी दीड कोटी महिलांचे उत्पन्न एक लाखापेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार नाही. ज्यांचे उत्पन्न निकषापेक्षा अधिक असल्याची शंका आहे, त्यांचीच पुन्हा पडताळणी केली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले. ज्या महिलांना आपण निकषात बसत नसल्याची माहिती मिळेल त्यांनी स्वतः पुढे येऊन या योजनांचा लाभ नाकारावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  टोलनाक्यांच्या अनियमिततेवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले. जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय...
मावळ तालुक्यातील लाचखोर मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती
'माझ्याही कुंकवाला न्याय द्या'
रस्त्यांच्या दुरवस्थेवर मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक; तातडीने खड्डे बुजवण्याची सरकारकडे मागणी
'चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराज सरकारचं करायचं काय?'
समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक

Advt