आता पंकजा मुंडे सुरेश धस यांच्या रडारवर

बीडच्या दोन्ही नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा

आता पंकजा मुंडे सुरेश धस यांच्या रडारवर

मुंबई: प्रतिनिधी 

संतोष देशमुख हत्याप्रकरणासह धनंजय मुंडे यांच्या विरोधात विविध आरोपांची तोफ डागणारे आमदार सुरेश धस यांनी आता आपला मोर्चा आपल्याच पक्षातील मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे वळवला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देईपर्यंत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विरोधात चकार शब्द काढलेला नाही. याबद्दल आपण त्यांच्या विरोधात पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार आहोत, असा इशारा धस यांनी दिला आहे. त्यानंतर आता सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. 

पंकजा मुंडे यांनी देखील धस यांना प्रत्युत्तर देताना, मी भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय नेता असताना देखील धस आपल्यावर आरोप करीत आहेत. त्याबद्दल पक्ष नेतृत्वाने त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी मागणी केली आहे. 

सगळीकडे कॅमेरे बरोबर घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडे यांची भेट लपून छपून का घेतली, असा सवाल मुंडे यांनी केला तर, कॅमेरे माझ्या मागे येतात. त्यांनी कुठे यावे हे मी ठरवत नाही, असे उत्तर धस यांनी दिले आहे.

हे पण वाचा  'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'

धनंजय मुंडे पालकमंत्री असताना सुद्धा वाल्मीक कराड त्यांच्यासाठी काम करत होता. त्यावेळी देखील धस हे आमदार होते. मग त्यांनी त्याच वेळी कराड याच्या विरोधात एकही तक्रार का केली नाही, असा सवाल मुंडे यांनी केला आहे. मी मंत्री झाल्यावर अचानकच धस यांना बीडमध्ये वाढती गुन्हेगारी दिसून आली का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन काळातच याप्रकरणी कारवाईचे आश्वासन दिलेले असून देखील धस यांनी हे प्रकरण सभागृहाबाहेर का पेटते ठेवले आहे, असा पंकजा मुंडे यांचा सवाल आहे तर, संतोष देशमुख हे भाजपचे बूथ प्रमुख होते. त्यांच्यासाठी आपण हे प्रकरण पेटत ठेवणारच, असे प्रत्युत्तर धस यांनी दिले आहे. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित
  मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के
'भारतातील जनता नाही तर नेतेच जातीयवादी'
'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ
समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ
औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे

Advt